थकीत ऊस बिलांमध्ये भाकियू संतप्त, उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

साखर कारखान्यांकडून अद्याप शेतकऱ्यांना ऊस बिले मिळाली नसल्याने संतप्त भारतीय किसान युनियनने २० ऑगस्ट रोजी दी किसान सहकारी साखर कारखान्यात पंचायतीचे आयोजन केले आहे. राष्ट्रीय अध्यक्ष चौधरी हरपाल सिंह यांच्या अध्यक्षतेखाली ही पंचायत होईल. याबाबत सोमवारी पदाधिकाऱ्यांनी उप जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले.
निवेदन देताना तहसील अध्यक्ष चौधरी समरपाल सिंह म्हणले, कारखान्याने गेल्या वर्षीच्या उसाची थकबाकी अद्याप दिलेली नाही. शेतकऱ्यांना प्रचंड आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. वारंवार निवेदने देऊन, मागण्या मांडूनही फरक पडलेला नाही. ठराविक वेळेनुसार वीज उपलब्ध नसल्यानेही शेतकरी अडचणीत आले आहेत. पाऊस न झाल्यामुळे शेतकऱ्यांची कोंडी झाली आहे. वीज नसल्याने पिके वाळू लागली आहेत. ठरलेल्या शेड्यूलनुसार वीज पुरवठा करण्यात यावा अशी मागणी त्यांनी केली. राज्य अध्यक्ष हरपाल सिंह यांच्या नेतृत्वाखाली २० ऑगस्ट रोजी कालाखेडा साखर कारखान्यात पंयाचतीचे आयोजन केले आहे. त्यामध्ये शेतकऱ्यांच्या समस्या मांडल्या जातील असे त्यांनी सांगितले. विज विभागाचे कार्यकारी अभियंत्यांना शेतकऱ्यांच्या समस्या सांगाव्यात अशी मागणी त्यांनी केली. यावेळी जगदीश सिंह, जय सिंह, जसवीर खड़गवंशी, धीरज सिंह, चेतन सिंह आदी उपस्थित होते.

चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here