ऊस बिले न मिळाल्यास आंदोलनाचा भाकियूचा इशारा

पीलभीत : बरखेडा हिंदूस्थान साखर कारखान्याने ऊस बिले दिली नसल्याने भारतीय किसान युनियनच्या किसान सरकार गटाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. यावेळी त्वरीत ऊस बिले न मिळाल्यास आंदोलनाचा इशाका भाकियूने दिला.
याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, एका आठवड्यात ऊस बिले मिळाली नाहीत तर आंदोलन केले जाईल. ऊस बिलाबाबत होणाऱ्या आंदोलनांना सरकारने अटकाव करू नये. दरम्यान, या बैठकीत जिल्हा समितीची स्थापना करण्यात आली. यामध्ये मुरलीधर कश्यप यांना जिल्हाध्यक्षपदी नियुक्त करण्यात आले. तर वीरेंद्र रस्तोगी यांना कार्यवाह, पातीराम आणि बाबूराम यांना उपाध्यक्ष म्हणून निवडण्यात आले. सोमपाल यांच्याकडे सचिवपदाची जबाबदारी देण्यात आली. तर प्रेमपाल यांना महासचिव, धर्मेंद्र तसेच लालता प्रसाद यांच्याकडे प्रचार विभागाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here