कोकण, पश्चिम महाराष्ट्रात गणेशोत्सवात बरसणार वरुणराजा

मुंबई : भारतीय हवामान विभागाने कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रासह संपूर्ण राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार आणि अती मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. पुढच्या काही काळात बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण होणार आहे. त्यामुळे आयएमडीने अॅलर्ट जारी केला आहे. महाराष्ट्रातील अनेक विभागांत पावसाचा जोर राहील. त्यामुळे ऑरेंज आणि यलो अॅलर्ट देण्यात आला आहे.

सप्टेंबरमध्ये पहिल्या आठवड्यात राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. गणेशोत्सवातही खास करून कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता आहे. सध्या कोकणात रत्नागिरी जिल्ह्यात पाऊस सुरू आहे. १२ सप्टेंबरपासून याचा जोर वाढणार आहे. पश्चिम मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. याशिवाय विदर्भात नागपूरसह काही ठिकाणी चांगल्या पावसाची शक्यता आहे.

मुंबईत गेल्या २४ तासात वरुणराजा जोरदार बरसला आहे. पुढील काळात अशीच परिस्थिती राहील. रडार आणि सॅटेलाईट छायाचित्रांमध्ये पावसाची स्थिती दिसून येत आहे. रत्नागिरी जिल्ह्यात ऑरेंज अॅलर्ट जारी करण्यात आला असून पुणे, सातारा, कोल्हापूर, रायगड, सिंधुदुर्ग जिल्ह्यात यलो अॅलर्ट जारी करण्यात आला आहे. महाराष्ट्रात आगामी चार ते पाच दिवस जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here