ऊसाचे पैसे भागवण्यास विलंब केल्यास कारवाईचा इशारा

शामली : डीएम जसजीत कौर यांनी ऊस थकबाकी भागवण्यास विलंब करणार्‍या कारखान्यांवर नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी थकबाकी न भागवणार्‍या कारखान्यांविरोधात कारवाईचा इशारा दिला आहे. जिल्ह्यातील साखर कारखान्यांवर 639 करोड रुपयांचे देय आहे.

गुरुवारी डीएम जसजीत कौर यांनी जिल्हाधिकारी सभागृहात शामली, थानाभवन, ऊन साखर कारखाना आणि ऊस विभागाच्या अधिकार्‍यांबरोबर बैठक घेवून थकबाकीबाबत चर्चा केली. शामली आणि थानाभवन साखर कारखान्याने 31 जानेवारी, ऊन साखर कारखान्याने 1 फेब्रुवारी पर्यंत खरेदी केलेल्या ऊसाचे पैसे दिले आहेत. कारखान्यांवर शेतकर्‍याचे एकूण 639 करोड रुपये देय आहेत. शामली साखर कारखान्याने 45.89 टक्के, ऊन कारखान्याने 51.50 टक्के, थानाभवन कारखान्याने 45.82 टक्के असे ए़कूण मिळून जिल्ह्यामध्ये 47.92 टक्के थकबाकी भागवण्यात आली आहे. शामली कारखान्यावर 210 करोड 23 लाख, ऊन कारखान्यावर 163 करोड 55 लाख रुपये, थानाभवन कारखान्यावर 265 करोड 93 लाख रुपये देय आहेत. डीएम नी शामली साखर कारखान्याला ऑगस्ट अखेर पर्यंत 40 करोड रुपये,ऊन कारखान्याला 50 करोड तर थानाभवन ला 50 करोड रुपयांची बाकी भागवण्याचे लक्ष्य दिले आहे.

बैठकीमध्ये जिल्हा ऊस अधिकारी विजय बहादुर सिंह, शामली साखर कारखान्याचे वरिष्ठ ऊस व्यवस्थापक दीपक राणा, विजित जैन, थानाभवन कारखान्याचे यूनिट हेड वीरपाल सिंह, ऊस महाव्यवस्थापक जेबी तोमर, अकाउंट हेड सुभाष बहुगुणा, ऊन साखर कारखान्याचे ऊस महाव्यवस्थापक अनिल कुमार अहलावत, अकाउंट हेट विक्रम सिंह आदी उपस्थित होते.

 

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here