पुणे शहर आणि जिल्ह्यातील चार तालुक्यांना सिंचन आणि पिण्यासाठी पाणीपुरवठा करणार्या खडकवासला साखळी प्रकल्पातील पाणलोट क्षेत्रात काही दिवसांपासून पावसाचा जोर कायम राहिला आहे; खडकवासला साखळीतील चारही धरणांत अवघ्या चार दिवसांत सुमारे पावणेसहा टीएमसी पाणीसाठा झाला आहे. एकूण साठा एकवीस टीएमसीवर पोहोचल्याने शहरासह जिल्ह्यातील चार तालुक्यांच्या पेयजलासह घरगुती वापर आणि सिंचन यासाठी पंधरा महिने पुरेल एवढा पाणीसाठा झाला आहे.
खडकवासला साखळी प्रकल्पात रविवारपासून पावसाने हजेरी लावण्यास सुरुवात केली. सोमवारी दिवसभर खडकवासला साखळीतील धरण पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाला. याचबरोबर जिल्ह्यातील बहुतांश धरणांत संततधार सुरूच होती. खडकवासला साखळीतील टेमघर धरण पाणलोट क्षेत्रात सोमवारी सकाळी आठपर्यंत 69 आणि सायंकाळी पाच वाजेपर्यंत 60 मिलिमीटर पावसाची नोंद झाली.
सोमवारी सायंकाळपर्यंत खडकवासला साखळीमध्ये असलेल्या चारही धरणांत 20.97 टीएमसी (71.93 टक्के) पाणीसाठा झाला आहे. सोमवारी सायंकाळी सहा वाजता त्यात 5 हजार 136 क्यूसेकपर्यंत वाढ करण्यात आली. गुंजवणी धरण पाणलोट क्षेत्रात सोमवारी सकाळी आठपर्यंत 29 आणि सायंकाळी पाचपर्यंत 27 मिलिमीटर पाऊस झाला. निरा-देवघरला सकाळ पर्यंत 67 आणि सायंकाळ पर्यंत 42 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. भाटघरला सकाळ पर्यंत 17 आणि सायंकाळ पर्यंत 25 मिलिमीटर पाऊस झाला. गुंजवणीत 2.92 (74.14 टक्के), निरा-देवघर 8.27 (70.54 टक्के), भाटघर 15.72 (66.90 टक्के) आणि वीर धरणात 9.20 (97.83 टक्के) टीएमसी पाणीसाठा झाला आहे. वीर धरण भरण्याच्या मार्गावर असल्याने सोमवारी सकाळी डाव्या आणि उजव्या कालव्यातून 2,150 क्युसेकने पाणी सोडण्यात येत होते. सायंकाळी त्यात 13 हजार 716 क्यूसेक वाढ करण्यात आली असल्याचे जलसंपदा विभागातील अधिकार्यांनी सांगितले.
ChiniMandi, Mumbai: 9th Aug 2025
Domestic Market
Domestic sugar prices were reported weak
Domestic sugar prices were reported to be weak on sluggish off take at higher...
परभणी : सद्यस्थितीत ट्वेंटीवन शुगर्स कारखाना कार्यक्षेत्रातील काही गावांमध्ये महाराष्ट्र शासनामार्फत बंदी आणलेल्या तसेच मराठवाडा विभागासाठी शिफारस नसलेल्या ऊस जातीची लागवड झाली आहे. शिफारस...
इस्लामाबाद : अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तान सरकारने अस्वीकार्यपणे वाढलेल्या किमती आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (आयएमएफ)ने उपस्थित केलेल्या चिंतेमुळे १,००,००० मेट्रिक टन साखर आयातीची निविदा...
नवी दिल्ली : केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी इथेनॉल-मिश्रित इंधनाच्या वापरामुळे वाहनांच्या कार्यक्षमतेवर परिणाम होण्याबाबतच्या दाव्यांचे खंडन केले. अशा प्रकारची चर्चा म्हणजे...
कोलंबो : चार स्थानिक कारखान्यांमध्ये उत्पादित होणारी ब्राउन साखर विकण्यास अडचणी निर्माण झाल्यामुळे सरकारने, गुप्तपणे साठवलेला साठा बाजारात आणण्यात काही माफिया सहभागी आहेत का...