सिंचनासाठी कालिंगारायण कालव्यात पाणी सोडले

कोईमतूर : भवानी सागर धरणातून कलिंगारायण कालव्यात पाणी सोडण्यात आले आहे. या पाण्याचा उपयोग जिल्ह्यातील १५ हजार ७४३ एकर क्षेत्राला सिंचनासाठी होणार आहे.

राज्य सरकारने २१ जुलै ते १७ नोव्हेंबर या १२० दिवसांच्या कालावधीत पाणी सोडण्याबाबतचे वेळापत्रक जाहीर केले आहे. या पाण्याचा फायदा एरोडा, मोडककुरीची आणि कोडूमुडी तालुक्यातील शेतकऱ्यांना होणार आहेत. बुधवारी सोडलेले धरणातील पाणी कोडीवरी अनिकटला आधी पोहोचले. त्यानंतर ते तेथून भवानी येथे कलिंगरायण येथे पोहोचले. कार्यकारी अभियंता ए. अरुल, सहाय्यक कार्यकारी अभिंया जयप्रकाश आणि सहाय्यक अभियंता धीनाकरन यांच्यासह जलसंपदा विभागाचे अधिकारी, शेतकऱ्यांनी धरणाची तसेच बंधाऱ्यांची दारे उघडून कालव्यात पाणी सोडले.

कालव्याची लांबी ९१.१० किलोमीटर असून या कालव्यातून १५ हजार ७४३ एकर क्षेत्र सिंचनाखाली येते. तीन तालुक्यातील क्षेत्र या पाण्याने ओलीताखाली येते. त्यामुळे आता शेतकरी हळद, भात, ऊस लागवडीसाठी शेती तयार करीत आहेत. आयकुट क्षेत्रातील सुमारे ६० टक्के शेतकरी हळद लागवड करतात. मात्र, या परिसरात १० टक्क्यांहून कमी क्षेत्रावर ऊस लागवड केली जाते.

सकाळी आठ वाजता धरणाची पाणीपातळी ९६.४२ फूट इतकी होती. तर धरणाची महत्तम पातळी १०५ फूट आहे. सध्या धरणाचा साठा २६.०१ टीएमसी आहे. तर धरणाची एकूण साठा क्षमता ३२.८० टीएमसी आहे. धरणातून २५१९ क्यूसेक पाणी सोडण्यात येत असून अरकणकोट्टईत ६०० क्यूसेक तर थडापल्ली आणि कालिंगरायण कालव्यात ४०० क्यूसेक पाणी सोडण्यात येत आहे.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here