बुलंदशहर(उत्तरप्रदेश) : जनपद येथील तीन साखर कारखान्यांनी 80 टक्के आणि वेव साखर कारखान्याने लक्ष्यापेक्षा अधिक ऊस गाळप केले आहे. वेेव साखर कारखान्याने रविवारी पासून गाळप हंगाम बंद करण्याचा इशारा शेतकर्यांना दिला आहे. पण अजून ऊस विभागाने गाळप हंगाम बंद करण्याची पवारनगी कारखान्याला दिलेली नाही.
साखर कारखाना व्यवस्थापनाने गाळप क्षमते प्रमाणे ऊस उपलब्ध न झाल्यामुळे जिल्हा ऊस अधिकार्यांकडे गाळप बंद करण्याची परवानगी मागितली आहे. कारखाना व्यवस्थापनाने म्हटले आहे की, रोज 25 हजार क्विंटल ऊस गाळपाची कारखान्याची क्षमता आहे. 10 ते 15 हजार क्विंटल ऊस उपलब्ध होत आहे. ऊस संपत आला आहे, यामुळे कारखाना वारंवार बंद करावा लागत आहे. लक्ष्यापासून हा कारखाना 1.38 लाख क्विंटल गाळपापासून मागे आहे. व्यवस्थापनाचा दावा आहे की, शनिवार आणि रविवार पर्यंत लक्ष्य पूर्ण केले आहे. कारखाना व्यवस्थापनाने ऊसाच्या कमीमुळे 29 क्रय केंद्र आणि कारखाना गेट ला फ्री केले आहे. क्षेत्रातील कोणीही शेतकरी पावतीशिवाय देखील कारखान्यात ऊस घालू शकतो.
जिल्हा ऊस विभागानुसार, जनपद चे साडे नउ हजार शेतकरी वेव साखर कारखान्याला ऊस पुरवठा करतात. 5760 हेक्टर क्षेत्रफळाचे ऊस क्षेत्र आहे आणि 29 लाख क्विंटल ऊस गाळपाचे लक्ष्य कारखाना व्यवस्थापनाला दिले गेले होते. कारखान्याने गुरुवार पर्यंत 27.62 हजार क्विंटल ऊस गाळप केले आहे. याबरोबरच तीन लाख पाच हजार क्विंटल साखर उत्पादन केले आहे.
शेतकर्यांना चालू गाळप हंगामातील एक रुपयाही मिळालेला नाही. वेव साखर कारखान्यावर शेतकर्यांचे 80 करोड रुपये देणे आहे. यावेळी जिल्हा ऊस अधिकारी डीके सैनी म्हणाले, वेव साखर कारखाना बंद चे पत्र मिळाले आहे. पण अजूनपर्यंत परवानगी मिळालेली नाही. फिल्ड ऑफिसर्स कडून कुठल्याही शेतकर्याचा ऊस राहिलेला नाही याची तपासणी केली जाईल. ऊस नसेल तरच बंदीची परवानगी दिली जाईल.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.