ऊस संपल्यानंतरच गाळप हंगाम पूर्ण करणार: त्रिवेणी साखर कारखाना

देवबंद : कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील ऊस पूर्णपणे संपल्यानंतरच गाळप हंगाम बंद केला जाईल, अशी माहिती त्रिवेणी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष दिनानाथ मिश्र यांनी दिली.

साखर कारखान्याने १८ मे रोजी कारखाना बंद करण्याची नोटीस बजावली होती. मात्र, उसाची उपलब्धता पाहता गाळप हंगाम सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. याबाबत मंगळवारी साखर कारखाना प्रशासन आणि आमदार बृजेश सिंह यांच्यामध्ये चर्चा झाली. त्यानंतर उपाध्यक्ष दिनानाथ मिश्र यांनी सांगितले की, कार्यक्षेत्रातील ऊस पुन्हा एकत्र करून गाळप केला जाईल. शेतकऱ्यांनी कारखान्याला लवकरात लवकर ऊस पाठवून सहकार्य करावे असे आवाहन मिश्र यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here