योगी सरकारचा गहू, ऊस खरेदीत उच्चांक, प्रियंका गांधींकडून जनतेची दिशाभूल : सूर्य प्रताप शाही

नवी दिल्ली : काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी-वाड्रा यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पत्र लिहून गव्हाच्या खरेदीवर प्रश्न उपस्थित केल्याबाबत उत्तर प्रदेशचे कृषी मंत्री सूर्य प्रताप शाही यांनी आक्षेप घेतला आहे. शाही यांनी सांगितले की, प्रियंका गांधी यांच्यासारख्या नेत्यांना तथ्यहीन आणि खोटे बोलणे शोभत नाही असे शाही म्हणाले.

राज्याचे कृषी मंत्री शाहू म्हणाले, प्रियंका यांच्यासारख्या एक जबाबदार नेत्यांनी पत्र लिहिण्यापूर्वी तथ्य शोधले पाहिजे. गहू खरेदी करण्याच्या सरकारच्या प्रयत्नांची माहिती घ्यायला हवी. काँग्रेस नेत्यांनी योगी सरकारचे कौतुक करण्याची अपेक्षा नाही. मात्र, शेतकऱ्यांच्या हितासाठी कार्यरत योगी सरकारने राज्यातील ८६ लाख शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम केले आहे. सरकारने पहिल्या कॅबिनेट बैठकीत ३६ हजार कोटी रुपयांचे कर्ज मंजुर करुन दिलासा दिला आहे.
कोरोनासारख्या स्थितीतही उच्चांकी गहू खरेदी झाली आहे. रब्बी हंगामात १२.८४ लाख शेतकऱ्यांकडून ५६ लाख मेट्रिक टन गव्हाची खरेदी झाली असून ९० टक्के शेतकऱ्यांना पैसे दिले आहेत. या सरकारच्या कार्यकाळात २०० मेट्रिक टनाच्या उद्दीष्टापेक्षा अधिक २२० मेट्रिक टन गहू खरेदी केला आहे. सरकारने ३६,५० कोटी रुपये अदा केले आहेत. त्याचा लाभ ४५ लाख शेतकऱ्यांना मिळाला आहे.

रब्बी हंगामात गहू खरेदीची मुदत १५ जूनवरुन २२ जून करण्यात आली आहे असे मंत्री शाही यांनी सांगितले. खरेदी केंद्रांची संख्या ५००० वरुन वाढवून ६००० करण्यात आली आहे. ई पॉप मशीन वापरण्यात आली असून ७२ तासात शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये पैसे देण्यात आले आहेत. योगी सरकारने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना १ लाख ३७ हजार कोटी रुपयांची बिले आपल्या कार्यकाळात अदा केली आहेत असे मंत्री शाही यांनी सांगितले.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here