कुंभी-कासारी कारखान्याकडून २५ कोटींची ऊस बिले जमा : चेअरमन चंद्रदीप नरके

कोल्हापूर : करवीर तालुक्यातील कुडित्रे येथील कुंभी- कासारी सहकारी साखर कारखान्याकडून चालू गळीत हंगामातील १५ जानेवारीअखेरची ऊस बिल संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आली आहेत. या उसाला प्रतीटन ३,२०० रुपयांप्रमाणे २५ कोटी ५३ लाख ४६ हजार रुपये संबंधितांना अदा करण्यात आले आहेत. कारखान्याचे चेअरमन, माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी ही माहिती दिली.

चेअरमन चंद्रदीप नरके म्हणाले की, कारखान्याला गळीताचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सर्व ऊस उत्पादक सभासद, बिगर सभासद यांनी संपूर्ण पिकवलेला ऊस गळीतास पाठवून सहकार्य करावे. यंदाच्या हंगामात गळीतास आलेल्या ७९ हजार ७९५ मे. टन उसाची रुपये ३२०० प्रमाणे होणारी सर्व रक्कम शेतकऱ्यांना देण्यात आली आहे. यावेळी व्हाइस चेअरमन विश्वास पाटील, संचालक मंडळ सदस्य, कार्यकारी संचालक धीरजकुमार माने, सेक्रेटरी प्रशांत पाटील, कामगार प्रतिनिधी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here