बिहार: रिगा साखर कारखाना सुरू करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना साकडे

सीतामढी : संयुक्त शेतकरी संघर्ष मोर्चाचे उत्तर बिहार अध्यक्ष डॉ. आनंद किशोर, जिल्हाध्यक्ष जलंधर यदुवंशी, महासचिव संजीव कुमार सिंह तसेच रिगा अध्यक्ष पारसनाथ सिंह यांनी मुख्यमंत्री नीतीश कुमार यांच्याकडे रिगा साखर कारखाना सक्षम उद्योजकांच्या मदतीने सुरू करण्याची मागणी केली आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांना ई-मेल पाठवण्यात आला आहे. एनसीएलटीला १९ जुलै रोजी याबाबतची योजना सादर करून कारखाना वाचवावा अशी मागणी केली आहे.

भास्करमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, शेतकरी नेत्यांनी सांगितले की, मुख्यमंत्र्यांना कारखान्यासाठी एखादा सक्षम उद्योजक मिळणे हे सहजसोपे आहे. ऊस विकास विभागाच्या अधिकाऱ्यांवर कारखाना सुरू करण्याबाबत विश्वास ठेवणे शक्य नाही. त्यांच्यामुळेच कारखाना बंद पडला आहे. त्यांनी शेतकरी, कामगार आणि एनडीए, महाआघाडीची लूट केली आहे. रिगा साखर कारखाना सुरू झाला तर डिस्टिलरीसह खत उद्योगही सुरू राहील. तीन उद्योग जर सुरू राहिले तर ते सरकारचे यश ठरेल. त्याचा फायदा संपूर्ण राज्याला होईल, असे शेतकऱ्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here