कांग्रेस खासदाराने ऊस थकबाकीच्या मुदयावरुन पंजाब सरकारवर साधला निशाणा

चंदीगड : कांग्रेस खासदार प्रताप सिंह बाजवा यांनी मंगळवारी पंजाब मध्ये आपल्या पक्षाच्या सरकार वर राज्यातील ऊस उत्पादकांचे 681.48 करोड़ रुपयांचे देणे बाकी आहे. ही देणी भागवण्याबाबत सरकारने ठोस पावले न उठवल्याचा आरोप केला आहे. मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांना पाठवलेल्या पत्रात बाजवा यांनी दावा केला की, जवळपास 70,000 ऊस उत्पादकांना 2018-19 आणि 2019-20 हंगामासाठी सहकारी आणि खाजगी ऊस कारखान्यांकडून 681.48 करोड़ रूपयांचे देय आहे. ते म्हणाले, ‘‘ही खूप चिंताजनक बाब आहे की अनेक वर्षांपासून थकबाकी भागवलेली नाही. शेतकऱ्यांची देणी भागवण्यासाठी सरकारने ठोस पावले उचलली नाहीत. ते म्हणाले, ऊस नियंत्रण आदेश आणि ऊस खरेदी तसेच ऊस नियमन अधिनियमा अंतर्गत 3(3) नुसार कारखान्यांना ऊस खरेदीच्या 14 दिवसांच्या आत पैसे देणे आवश्यक आहे. बाजवा यांनी लिहिले आहे की,‘‘ अन्यथा, कारखान्यांना विलंबासाठी व्याजासह पैसे भागवावे लागतील.’’ राज्यसभा सदस्यांनी सांगितले की, थकबाकी भागवली नसल्याने हजारो ऊस शेतकऱ्यांना आर्थिक अडचणी येत आहेत आणि त्यापैकी अनेकांवर मोठे कर्ज आहे. त्यांनी मागणी केली की, सरकारने ऊस शेतकऱ्यांना थकबाकी मिळवण्यासाठी ठोस पावले उचलावीत. हे शेतकरी पीक विविधीकरण कार्यक्रमामध्ये मदत करतात.माजी प्रदेश कांग्रेस प्रमुख यांनी सांगितले की, दोन खाजगी कारखान्यांनी यापूर्वीच शेतकऱ्यांची देणी भागवली आहेत, तर इतर कारखाने असे का करत नाहीत. त्यांनी लिहिले की, ‘‘ही सरकारची चूक आहे कि कारखाने राज्यातील नियम कायदे तोडत आहेत आणि त्यांना शिक्षा होत नाही.’’ त्यांनी राज्य सरकारकडे शेतकऱ्यांची 681.48 करोड़ रुपयांची देणी तात्काळ भागववावीत, अशी मागणी केली आहे.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here