आग लागून पाच एकर ऊसाचे पिक जळाले

खरखौदा : खरखौदा परिसरातील लालपूर गावातील एका शेतकऱ्याने वीजेची एक लाईन खराब होण्याची तक्रार केली होती. पण त्या तक्रारीची दखल घेतली गेली नाही. परिणामी त्या शेतकऱ्याच्या पाच एकर ऊसाचे पीक जळून गेले. याची तक्रार पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. शेतकरी महावीर सिंह यांचे पूत्र संजीव कुमार म्हणाले, त्याची शेती लालपूर मंढैया रोडवर शेतजमीन आहे. इथून जुन्या खराब झालेल्या वीजेच्या तारा गेलेल्या आहेत आणि यामध्ये स्पार्क होत असतो, त्यामुळे शेतामध्ये आग लागण्याची शक्यता कायम असते.

महावितरण विभागाच्या दुर्लक्षामुळे पीडित शेतकऱ्याच्या ऊसाच्या पिकात आग लागली आणि पाच एकर पीक जळून गेले. याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here