हंगाम 2023-24: महाराष्ट्रातील 105 साखर कारखान्यांनी दिले 100% ऊस बील

पुणे : साखर आयुक्त कार्यालयाच्या आकडेवारीनुसार, 15 मार्चपर्यंत राज्यातील 206 साखर कारखान्यांकडे (तोडणी आणि वाहतुकीसह) एकूण ₹ 28,693 कोटी एफआरपी देय होती. साखर कारखान्यांनी (तोडणी आणि वाहतुकीसह) ₹28,830 कोटी FRP दिली आहे. जी एकूण देय FRP च्या 100% पेक्षा जास्त आहे. काही साखर कारखान्यांनी निर्धारित एफआरपीपेक्षा जास्त ऊस दर दिला आहे, ज्यामुळे देण्यात आलेली FRP ही 100% पेक्षा जास्त दिसत आहे.

राज्यातील 105 साखर कारखान्यांनी 100 टक्के एफआरपी दिली आहे. 54 कारखान्यांनी एकूण एफआरपीच्या 80 ते 99 टक्के रक्कम दिली आहे. 34 कारखान्यांनी 60 ते 79.99 टक्के तर 13 कारखान्यांनी 59.99 टक्क्यांपेक्षा कमी FRP दिली आहे. अशा कारखान्यांच्या ऊस बिलाकडे राज्यातील लाखो शेतकरी डोळा लावून बसले आहेत.

वास्तविक एफआरपीचा विचार केल्यास सरकारी आकडेवारीनुसार ती 26,856 कोटी रुपये आहे. आणि वास्तविक एफआरपीची थकबाकी 1,837 कोटी रुपये आहे. राज्यातील साखर कारखान्यांकडून 93.60 टक्के प्रत्यक्ष एफआरपी अदा करण्यात आली आहे. साखर आयुक्तालयाच्या आकडेवारीनुसार 2023-24 च्या हंगामात 15 मार्च 2024 पर्यंत 927.92 लाख टन उसाचे गाळप झाले आहे.अद्याप काही साखर कारखान्यांचा गाळप हंगाम जोमाते सुरु आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here