इथेनॉल उत्पादनामध्ये महाराष्ट्राची ‘ब्राजील पॅटर्न’ अवलंबण्याची तयारी

पुणे : महाराष्ट्रातील खासगी तसेच सहकारी अशा दोन्ही क्षेत्रातील साखर कारखान्यांकडून इथेनॉल उत्पादनातील प्रगती प्रशंसनीय आहे. साखर कारखान्यांना यावर्षी केवळ इथेनॉलपासूनच १२ हजार कोटी रुपये मिळणार आहेत. याबाबत साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी सांगितले की, ही कामगिरी साखर उद्योगासाठी खूप उत्साहवर्धक आहे आणि आमचे राज्य हळूहळू इथेनॉल उत्पादनात महाराष्ट्राच्या ब्राझील पॅटर्नच्या दिशेने वळत आहे. ॲग्रोवनला दिलेल्या मुलाखतीत गायकवाड यांनी महाराष्ट्रातील साखर उद्योग, इथेनॉल उत्पादन आणि महसूलाबाबत आपली मते मांडली.

ते म्हणाले की, गेल्या हंगामात साखर उद्योगाने शानदार कामगिरी केली आहे. याचे सर्व श्रेय साखर कारखाने, कारखान्यांचे कामगार, ऊस तोडणी मजूर, वाहतूकदार आणि मेहनती शेतकऱ्यांना दिले गेले पाहिजे. इथेनॉलबाबत सहकारी आणि खासगी कारखान्यांची प्रगती वेगात सुरू आहे. दर महिन्याला कोठे ना कोठे नवा प्रोजेक्ट येत आहे. गेल्या हंगामात कारखान्यांनी इथेनॉलपासून ९,५०० कोटी रुपयांची अतिरिक्त कमाई केली होती. कारखान्यांची ही घोडदौड पाहता, यावर्षी इथेनॉलपासून जवळपास १२ हजार कोटी रुपयांचा महसूल मिळेल अशी अपेक्षा आहे.

गायकवाड म्हणाले की, मला असे वाटते की या क्षेत्रातून साखर उद्योगाला दरवर्षी अतिरिक्त २-३ हजार कोटी रुपये मिळतील. असे म्हणता येईल की, आमचे राज्य हळूहळू ब्राझील पॅटर्नच्या दिशेने पुढे जात आहे. ब्राझीलमध्ये कारखाने जागतिक बाजारातील स्थितीच्या आधारावर ठरवतात की, यंदा जादा साखरेचे उत्पादन करायचे की इथेनॉलचे. याला जगभरात ब्राझील पॅटर्न म्हणून ओळखला जातो. ब्राझीलच्या पद्धतीने महाराष्ट्रही भविष्यात काही हंगामानंतर ही क्षमता प्राप्त करेल. आता राज्यातील साखर कारखान्यांना गरजेपेक्षा जादा साखर अथवा इथेनॉल उत्पादनाचे स्वातंत्र्य आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here