उस थकबाकी न भागवल्याने चार साखर कारखान्यांना नोटीस

बुलंदशहर: डीएम रविंद्र कुमार यांनी शेतकर्‍यांना गेल्या गाळप हंगामातील उस थकबाकी न भागवल्याने चार साखर कारखान्यांना नोटीस देण्यात आली आहे. या साखर कारखान्यांवर शेतकर्‍यांचे करोड रुपये देय आहेत. डीएम यांच्या आदेशावर डीसीओ यांच्याकडून नोटीसमध्ये साखर कारखान्यांच्या तात्काळ पैसे भागवण्यासाठी सांगितले आहे.

जिल्ह्यामध्ये ऊसाचे बंपर उत्पादन आहे. यामुळे दुसर्‍या जिल्यातील साखर कारखानेही बुलंदशहरातील शेतकर्‍यांचा ऊस खरेदी करते. गेल्या गाळप हंगाम 2019-20 मध्ये खरेदी करण्यात आलेल्या ऊसाचे चार साखर कारखान्यांवर शेतकर्‍यांचे करोडो रुपये देय आहेत. ऊस विभागानुसार, बुंलदशहर च्या वेब साखर कारखन्याकडून गेल्या गाळप हंगामाचे 33.12 करोड, अनूपशहर च्या दि सहकारी साखर कारखान्याकडून 19.34 करोड, हापुड जिल्ह्यातील दि सिभावली साखर कारखान्याकडून 19.5 करोड आणि याची दुसरी शाखा बूजनाथपूर कारखान्याने 16.27 करोड रुपये भागवलेले नाहीत. पहिल्यांदाही अनेकदा पैसे भागवण्याबाबत पत्र देण्यात आले आहे, पण शेतकर्‍यांचे पैसे देण्यात आलेले नाही. आता डीएम यांच्या आदेशावर डीसीओ यांच्याकडून नोटीस जारी करुन या साखर कारखान्यांना नोटीस जारी करुन पैसे भागवण्यास सांगितले आहे. डीएम यांनी स्पष्ट सांगितले आहे की, शेतकर्‍यांना प्रत्येक वर्षी वेळेत पैसे दिले जावेत. अन्यथा पैसे न देणार्‍या कारखान्याविरोधात आवश्यक ती कारवाई केली जाईल.

जिल्हा ऊस अधिकारी डीके सैनी यांनी सांगितले की, बुलंदशहरासह इतर जिल्ह्यातील चार साखर कारखान्यांवर शेतकर्‍यांचे गेल्या हंगामाचे पैसे अडकलेले आहेत. डीएम यांच्या आदेशावर साखर कारखान्यांना पैसे देण्यासाठी नोटीस जारी करण्यात आली आहे. पैसे न दिल्यास कारवाई केली जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here