नव्या गळीत हंगामापूर्वी थकीत ऊस बिले द्या : जिल्हाधिकारी

शामली : जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा गळीत हंगाम या महिन्यात सुरू होईल. शामली आणि थानाभवन कारखाना २८ ऑक्टोबरपासून तर ऊन साखर कारखाना चार नोव्हेंबर रोजी गाळप सुरू करेल. जिल्हाधिकारी जसजित कौर यांनी जिल्ह्यातील सर्व कारखान्यांच्या ऊस बिलांचा आढावा घेतला. त्यांनी सांगितले की, गळीत हंगाम सुरू होण्यापूर्वी मागील हंगामातील सर्व बिले कारखान्यांनी अदा करावीत, अन्यथा त्यांचे ऊस क्षेत्र कमी केले जाईल. याशिवाय कारखाना व्यवस्थापनाविरोधात कडक कारवाई केली जाणार आहे.

अमर उजालामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत जिल्हा ऊस अधिकारी विजय बहादूर सिंह यांनी सांगितले की, शामली, ऊन आणि थानाभवन कारखान्यांनी २०२१-२२ या हंगामात १,१५१.६५ कोटी रुपयांचा ऊस खरेदी केला होता. कारखान्यांनी आतापर्यंत ६३९.२२ कोटी रुपयांची बिले दिली आहेत. एकूण ६०.१९ टक्के बिले शेतकऱ्यांना मिळाली आहेत. चार कारखान्यांकडे ४५८.४२ कोटी रुपयांची थकबाकी आहे. यात शामली कारखान्याकडे ३७४.६७ कोटी रुपयांपैकी १९१.५२ कोटी रुपये थकीत आहेत. ऊन कारखान्याकडे ९९.७७ कोटी रुपये आणि थानाभवन कारखान्याकडे १६७.१३ कोटी रुपयांची थकबाकी आहे. एका महिन्यात कारखान्यांनी १०३ कोटी रुपयांची बिले दिली आहेत. बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी याविषयी नाराजी व्यक्त करत तातडीने बिले देण्याचे आदेश दिले. शामली कारखान्याचे महाव्यवस्थापक सुशील कुमार, के. पी. सरोहा, विजित जैन, ऊन कारखान्याचे महाव्यवस्थापक डॉ. कुलदीप पिलानिया, विक्रम, थानाभवन कारखान्याचे जी. व्ही. सिंह, सुभाष बहुगुणा उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here