‘कुंभी कासारी’कडून २७ कोटींची ऊस बिले अदा : चेअरमन तथा माजी आमदार चंद्रदीप नरके

कोल्हापूर : करवीर तालुक्यातील कुडित्रे येथील कुंभी-कासारी साखर कारखान्याने १६ ते ३१ जानेवारीअखेर गाळप झालेल्या उसापोटी प्रती टन ३२०० रुपयांप्रमाणे बिल शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा केले आहे. एकूण २७ कोटी ६७ लाख ३१ हजार रुपयांची ऊस बिले ऊस पुरवठाधारकांच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात आली आहेत. कारखान्याचे चेअरमन तथा माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी ही माहिती दिली.

चेअरमन नरके यांनी सांगितले की, या हंगामात १६ ते ३१ जानेवारीअखेर गळीतास आलेल्या ८६ हजार ४७८ मे. टन उसाची प्रती टन ३२०० रुपयांप्रमाणे एफआरपी अदा करण्यात आली आहे. यंदाच्या हंगामात साखर कारखान्याने जे गाळचे उद्दिष्ट निश्चित केले आहे, ते पूर्ण करण्यासाठी सर्व उत्पादक सभासद, बिगर सभासदांनी पिकविलेला ऊस गळीतास पाठवून सहकार्य करावे. यावेळी व्हा. चेअरमन विश्वास पाटील, सर्व संचालक, कार्यकारी संचालक धीरजकुमार माने, सचिव प्रशांत पाटील, कामगार प्रतिनिधी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here