आंबेडकरनगर : ऊस शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी ऊस विकास विभागाने चांगली शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना ३० सप्टेंबरपर्यंत अर्ज करावा लागेल. ऊस उत्पादकांना ऑनलाईन घोषणापत्र भरणे अनिवार्य करण्यात आले आहे.
जिल्हा ऊस अधिकारी डॉ. हरिकृष्ण गुप्ता यांनी सांगितल की, ऊस उत्पादन करणे आणि विभागातील विविध उपक्रमांमध्ये सहभागी होणाऱ्या उत्कृष्ट ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आणि ऊस विकास समित्यांना पुरस्कार देऊन सन्मानित केले जाणार आहे. ज्या शेतकऱ्यांनी उसाचे उत्पादन चांगले घेतले आहे, उसासोबत ते पशूपालन करीत असतील अशांनी ३० सप्टेंबरअखेर ऊस विकास परिषद मिझौडाकडे आपले अर्ज सादर करावेत. पिकाची कापणी पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या ऊस उत्पादनाचा आढावा घेऊन त्यातून उत्कृष्ट शेतकऱ्यांची निवड केली जाणार आहे. शेतकऱ्यांना ऊस शेती करण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी ऊस विकास विभागाने उत्कृष्ट शेतकरी पुरस्कारांचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला आहे. जे शेतकरी ऑनलाईन घोषणापत्र भरणार नाही, त्यांना ही प्रक्रिया अनिवार्य असल्याचे डॉ. गुप्ता यांनी सांगितले. घोषणापत्र न भरणाऱ्या शेतकऱ्यांचा ऊस गळीत हंगामात येणार नाही असेही ते म्हणाले.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link