ऊस दरासह शेतकऱ्यांच्या थकीत बिलांचा मुद्दा तापला

बिजनौर : भाकियू लोकशक्तीच्या बैठकीत सरकारने ऊस दर जाहीर करणे, बिलाई साखर कारखान्याकडून थकीत बिलाची वसुली करण्यासह विविध मुद्यांवर शेतकऱ्यांनी आपली मते मांडली. या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी पुढील रणनीती ठरविण्यात आली. संघटनेच्या मजबुतीवर भर देताना या विषयावर युवकांना एकत्र करण्याबाबत चर्चा झाली.

अमर उजालामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, पंमडावली येथे झालेल्या बैठकीत जिल्हाध्यक्ष चौधरी वीरसिंह सहरावत यांनी शेतकऱ्यांच्या समस्या मांडल्या. संघटनेने शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्याची भूमिका घेतली आहे. त्यापासून माघार घेतली जाणार नाही असे त्यांनी सांगितले. स्थानिक शेतकऱ्यांच्या संघटनेच्या सदस्यत्वाबाबतही चर्चा झाली. कारखान्यांकडून शेतकऱ्यांना दिला जाणारा त्रास सहन केला जाणार नाही, असे त्यांनी सांगितले. यावेळी पदाधिकारी निवडण्यात आले. भरतवीर सिंह यांना जिल्हा संघटन मंत्री, चौधरी प्रदीप राणा यांना बिजनौरचे युवा जिल्हाध्यक्ष, विपिन कुमार यांना विभागीय अध्यक्ष, निरुल चौधरी यांना युवा जिल्हा सचिव, चौधरी नरेश कुमार यांना ग्राम अध्यक्ष व रविंद्र सिंह त्यागी यांना जिल्हा सचिव पदाची जबाबदारी देण्यात आली. बैठकीस राष्ट्रीय महासचिव चौधरी पद्म सिंह, उपाध्यक्ष रामकुमार सिंह, प्रभारी जग्गन अली, देवेंद्र सिंह, मनीष चौधरी, फुरकान अली, विजेंद्र सिंह आदींनी आपली मते मांडली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here