आंबेडकर नगर : अप्पर मुख्य सचिव संजय भुसरेड्डी यांनी साखर कारखानदारांना लवकर ऊस बिले न दिल्यास कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. कारखान्यांनी तातडीने पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावेत अशा सूचना त्यांनी केल्या आहेत.
जिल्हा ऊस अधिकारी डॉ. हरी कृष्ण गुप्ता यांनी सांगितले की, अयोध्या विभागीय मंडलात साखर कारखान्यांनी आतापर्यंत ९३८.७३ कोटी रुपये ऊस बिलापोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले आहेत. त्यामुळे शेतकरी आनंदी आहेत. अप्पर मुख्य सचिवांनी सर्व अधिकाऱ्यांना त्वरीत पैसे शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा करावेत असे सांगितले आहे. यामध्ये टाळाटाळ करणाऱ्या कारखान्यांविरोधात कारवाई केली जाणार आहे. गळीत हंगाम २०२०-२१ मध्ये विभागातील कारखान्यांनी ३१२.३९ लाख क्विंटल उसाचे गाळप करून ६४.७९ लाख टन साखर उत्पादन केले आहे.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link












