मुदत संपलेल्या साखरेपासून गुळ बनवल्याचे प्रकरण उघडकीस

यमुनानगर : जिल्ह्यामध्ये मुदत संपलेल्या साखर आणि गुळाचे रीसाइक्लिगं करुन दोन प्लांटमध्ये कथित पद्धतीने गुळ तयार केल्याचे समोर आले आहे. मंगळवारी बिलासपूर उपमंडलमध्ये स्थित गुर्‍हाळामध्ये स्थानिक प्रशासनाच्या एका पथकाने छापा टाकला, ज्यामद्ये खाद्य सुरक्षा अधिकारी प्रेम सिंह, नायब तहसीलदार, बिलासपूर सह ड्यूटी मॅजिस्ट्रेट तरुण सहोता आणि बिलासपूर पोलिस स्टेंशन चे अतिरिक्त एस़एच ओचंद्र पाल शर्मा आदी सामिल होते.

पथकाला आढळले की, गुर्‍हाळांमध्ये मुदत संपलेल्या साखर आणि गुळाला रिसायइकल करुन उत्पादन तयार करत होते. पथकाला हेदीखील आढळले की, गुळाला अस्वच्छ परिस्थितीमध्ये तयार केले जात होते आणि अधिकांश श्रमिक मास्क घालत नव्हते आणि सामजिक अंतरही ठेवत नव्हते. पथकाने सदस्यांना गुळाचे नमुने तापसणीसाठी पाठवले. अधिकाऱ्यांनी सांगितले की, आम्ही मंगळवारी दोन गुर्‍हाळांमध्ये छापा मारला. गुळाचे सॅम्पल तपासणीसाठी पाठवले आहेत. रिपोर्ट आल्यानंतर पुढची कारवाई केली जाईल.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here