भारत SAF उत्पादनाचे जगातील सर्वात मोठे केंद्र बनले पाहिजे : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

नवी दिल्ली : ऊर्जा, हवामान बदल आणि प्रदूषण कमी करण्यासाठी भारतातील जैवऊर्जेच्या भूमिकेवरील शिखर परिषदेला संबोधित करताना, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी इथेनॉल आणि शाश्वत विमान इंधन उत्पादन (SAF) यावर लक्ष केंद्रित केले. टे म्हणाले की, अतिरिक्त फीडस्टॉक वापरून आपल्याला इथेनॉल उत्पादन वाढवण्याची गरज आहे. भारत हे शाश्वत विमान इंधनासाठी सर्वात मोठे उत्पादन केंद्र बनले पाहिजे. तो दिवस दूर नाही जेव्हा आमची सर्व विमाने आमच्या शेतकर्‍यांच्या माध्यमातून तयार केलेल्या विमान इंधनावर उडतील आणि जगातील विमानेही आमच्याद्वारे उत्पादित विमान इंधनावर धावतील.

मंत्री गडकरी म्हणाले, दावोस येथे विमान इंधन म्हणून SAF चा 5 टक्के वापर अनिवार्य करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. फ्लेक्स इंजिनबाबत बोलताना त्यांनी नमूद केले की, बजाज, टीव्हीएस, हिरो होंडा यांनी इथेनॉल-सुसंगत स्कूटर आणि मोटरसायकल तयार केल्या आहेत. सुझुकी आणि इतर कंपन्यांनीही मला आश्वासन दिले आहे की ते लवकरच फ्लेक्स इंजिन लाँच करतील.

मंत्री गडकरी म्हणाले की, नुमालीगढ (आसाम) येथे बांबूद्वारे इथेनॉलचे उत्पादन होत आहे. गडकरी यांनी नुमालीगढच्या एमडींना ईशान्य भागात बांबूचा इथेनॉल निर्मितीसाठी वापर करून २० टक्के इथेनॉल-मिश्रित पेट्रोलसह बांगलादेशला निर्यात करण्याचा सल्ला दिला. या उपक्रमामुळे इथेनॉल निर्यात सुलभ होईल. बांगलादेशसाठी किंमती 2 रुपयांनी कमी होतील आणि देशातील पर्यावरण संवर्धनालाही हातभार लागेल. याशिवाय, बांबू शेतीद्वारे आसाममधील लाखो तरुणांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होतील, असेही मंत्री गडकरी म्हणाले.

ते म्हणाले कि, आपल्याला 3 वर्षात तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनायचे आहे आणि अधिक रोजगार निर्मितीवर लक्ष केंद्रित करायचे आहे. हे साध्य करण्यासाठी आपल्याला इंधन क्षेत्रात निर्यातदार बनले पाहिजे. हे अवघड आहे पण अशक्य नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here