महाराष्ट्रात ९५७.५७ लाख क्विंटल साखर उत्पादन

पुणे: महाराष्ट्रातील गळीत हंगामात मोठ्या प्रमाणात कारखाने सहभागी झाले आहेत. साखर आयुक्तालयाने दिलेल्या माहितीनुसार, १८ मार्च २०२१ पर्यंत १८७ कारखान्यांनी गाळप केले आहे. राज्यात ९२०.२३ लाख टन उसाचे गाळप झाले आहे. एकूण ९५७.५७ लाख क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. राज्याचा सरासरी साखर उतारा १०.४१ टक्के इतका आहे.
आता कोल्हापूर विभागात २८ साखर कारखाने सुरू असून ९ कारखाने बंद झाले आहेत. सोलापूर विभागात सर्वाधिक ४१ कारखान्यांनी १८ मार्च २०२१ अखेर गाळप केले असून यापैकी ३१ कारखाने बंद झाले आहेत. राज्यात आतापर्यंत एकूण ५२ कारखाने गाळप संपल्याने बंद झाले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here