गाळप हंगाम 2023-24: ISMA द्वारे 15 एप्रिलपर्यंतच्या साखर उत्पादनाची आकडेवारी जाहीर

नवी दिल्ली : भारतातील 2023-24 चा ऊस गाळप हंगाम अंतिम टप्प्यात पोहोचला असून, इंडियन शुगर एंड बायो-एनर्जी मैन्युफैक्चरर्स एसोसिएशन (ISMA) ने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार मोठ्या संख्येने साखर कारखान्यांचा गाळप हंगाम संपू लागला आहे. चालू 2023-24 हंगामात 15 एप्रिल 2024 पर्यंत साखरेचे उत्पादन 310.93 लाख टनांवर पोहोचले आहे, जे मागील वर्षी याच तारखेला 312.38 लाख टन झाले होते.

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा एप्रिलच्या पहिल्या पंधरवड्यात कारखाने बंद होण्याचा वेग जास्त आहे. गेल्या वर्षीच्या 55 कारखान्यांच्या तुलनेत यंदा 128 कारखान्यांनी गाळप पूर्ण केले आहे. एप्रिल महिन्याच्या मध्यापर्यंत देशात 448 कारखाने बंद झाले आहेत, तर मागील वर्षी 401 कारखाने बंद झाले होते. गेल्या वर्षीच्या याच तारखेला 84 कारखाने सुरु होते, यंदा सध्या 48 कारखाने सुरु आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here