थायलंडमध्ये ऊस शेतकर्‍यांना शेत न जाळण्याचा इशारा

पट्टाया : थायलंडचे उद्योगमंत्री सूरिया जुआंगारुंग रुंगटिक यांनी सांगितलेकी, जे शेतकरी आपल्या ऊसाची शेती जाळतात, त्यांना सरकारकडून सहकार्य मिळणार नाही. त्यांनी संगितले की, पर्यावरण हानी कमी करणे, हा सरकारच्या या नितीचा उद्देश होता. मंत्री सूरिया यांनी सांगितले की, उद्योग मंत्रालय केवळ त्या शेतकर्‍यांची मदत करेल जे ताजा ऊस कापतात आणि तोच ऊस कारखान्यांना विकतात.

त्यांनी सांगितले की, ताज्या ऊसामुळे शेतकर्‍यांना सरकारकडून अधिक सहकार्य मिळेल. पण सर्व ऊस शेतकर्‍यांना त्यांच्या शेती मूल्यासाठी सरकारी अनुदान मिळेल. प्रत्येक वर्षी डिसेंबर ते मार्च पर्यंत ऊसाच्या तोडणीवेळी ऊसाचे शेत जाळणे हे वायु प्रदूषणाचे मुख्य कारण राहिले आहे. शेतकरी पानांपासून सुटका मिळवण्यासाठी ती जाळतात आणि ही पद्धत सर्वात सोपी आणि स्वस्त आहे.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here