डोईवाला साखर कारखान्याचा ऊस गाळप सुरू

ऋषिकेश : डोईवाला साखर कारखान्यामध्ये पूजा-अर्चा करून गळीत हंगामाचे उद्घाटन करण्यात आले. ऊस मंत्री सौरभ बहुगुणा यांनी सांगितले की, सरकार साखर कारखान्यांना तोट्यातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करीत आहे. शेतकऱ्यांनीही यासाठी आपले योगदान दिले पाहिजे. या हंगामात ३२ लाख क्विंटल ऊस गाळप करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.

डोईवाला साखर कारखान्याचा गळीत हंगाम प्रारंभ ऊस मंत्री सौरभ बहुगुणा, अर्थमंत्री प्रेमचंद अग्रवाल, आमदार बृजभूषण गैरोला यांच्या हस्ते करण्यात आला.

लाइव्ह हिंदूस्थानमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, ऊस मंत्री बहुगुणा म्हणाले की, उसाचा उतारा जादा मिळावा आणि कारखाने तोट्यातून बाहेर यावेत यासाठी हरेक प्रयत्न केले जात आहेत. उत्तर प्रदेश सरकारने आधी उसाचा दर जाहीर करावा. त्यानंतर उत्तराखंड सरकारही आपले समर्थन मूल्य जाहीर करेल. मंत्री प्रेमचंद अग्रवाल डोईवाला म्हणाले की, मी या विभागातील रहिवासी आहेत. साखर कारखान्याच्या उत्थानासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. डोईवालाचे आमदार बृजभूषण गैरोला यांनी सांगितले की, त्रिवेंद्र सरकारने साखर कारखान्याच्या पुनरुज्जीवनासाठी डीपीआर तयार केला होता. त्या आधारावरच प्रयत्न केले जात आहेत. कारखान्याचे कार्यकारी संचालक दिनेश प्रताप सिंह यांनी सांगितले की, यंदा ३२ लाख क्विंटल ऊस गाळप करण्याचे उद्दिष्ट कारखान्याने ठेवले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here