थानाभवन, शामली कारखान्याच्या गाळपास गती

शामली : जिल्ह्यातील थानाभवान आणि शामली साखर कारखान्याच्यावतीने ऊस गाळप गतीने सुरू आहे. ऊस मिळाल्यानंतर कारखान्यांच्या गाळपाने गती घेतली आहे. थानाभवन कारखान्याने सोमवारी ४७ हजार क्विंटल ऊस आणि मंगळवारी ५७ हजार क्विंटल उसाचे गाळप केले. कारखान्याचे ऊस विभागाचे वरिष्ठ महा व्यवस्थापक जे. बी. तोमर यांनी सांगितले की, दोन दिवसांत १.०४ लाख क्विंटल उसाचे गाळप करण्यात आले आहे. शामली कारखान्याने दोन दिवसांत ६४ हजार क्विंटल उसाचे गाळप केले आहे. सहाय्यक महा व्यवस्थापक दीपक राणा यांनी सांगितले की, कारखान्याने दहा नोव्हेंबर रोजी ६० हजार क्विंटल उसाचे इंडेट जारी केले आहे.

दरम्यान, ऊन कारखान्याच्या गाळप क्षमतेत पाच हजार क्विटंलची वाढ करण्यात आली आहे. मात्र, गिअर बॉक्स न मिळाल्याने गाळप हंगामात उशीर होत आहे. १२ नोव्हेंबरपर्यंत गिअर बॉक्स येण्याची अपेक्षा आहे. १४ नोव्हेंबरला कारखान्याचे गाळप सुरू होईल. ऊस विभागाचे महा व्यवस्थापक अनिल अहलावत यांनी सांगितले की, १२ नोव्हेंबर रोजी गळीत हंगामासाठी पूजा-अर्चा सुरू करण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here