उत्तर प्रदेश : साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांची ५,६६४ कोटींची ऊस बिले थकवली

लखनौ : गळीत हंगाम २०२२-२३ मध्ये गाळप केलेल्या उसाचे राज्यातील विविध साखर कारखान्यांकडे शेतकऱ्यांचे ५,६६४ कोटी रुपये थकीत आहेत, अशी माहिती उत्तर प्रदेश सरकारने बुधवारी दिली. थकीत बिलांच्या वसुलीसाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत, असे त्यांनी सांगितले.

PTI मध्ये प्रकाशित वृत्तानुसार, ऊस विकास मंत्री लक्ष्मी नारायण चौधरी यांनी राज्य विधानसभेचे सदस्य अजय कुमार यांनी एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात सांगितले की, २४ जुलैपर्यंत देण्यात आलेल्या माहितीनुसार, शेतकऱ्यांनी ५,६६४ कोटी रुपयांची ऊस बिले थकीत आहेत.

ते म्हणाले की, शेतकऱ्यांना उसाचे पैसे मिळवून देण्यासाठी नियम, कायदे अस्तित्वात आहेत. त्यानुसार, कारवाई केली जात आहे. थकबाकीदार साखर कारखान्यांना २१ एप्रिल, १९ मे आणि २२ जून रोजी नोटिसा जारी करण्यात आल्या आहेत.

उत्तर प्रदेशातील अनेक जिल्ह्यांमध्ये थकीत ऊस बिलापोटी शेतकऱ्यांकडून आंदोलने सुरू आहेत. ऊस बिले मिळत नसल्याने आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. दुसरीकडे थकीत बिले वसुलीसाठी कारवाई सुरू असल्याचा दावा सरकारने केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here