थकीत ऊस बिलांबाबत भाकियूच्या पंचायतीमध्ये रोष व्यक्त

अमरोहा : बाजार समितीमध्ये सोमवारी भाकियूच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या पंचायतीमध्ये शेतकऱ्यांच्या समस्या मांडण्यात आल्या. लवकरात लवकर ऊस बिले मिळावीत अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. सरकारने आश्वासन देऊनही खासगी कूपनलिकांची वीज बिले माफ करण्याबाबत आदेश काढला नसल्याचे सांगत शेतकऱ्यांनी रोष व्यक्त केला.

लाईव्ह हिंदूस्थानमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, मध्य गंगा कालवा लवकरात लवकर सुरू करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. शेतकऱ्यांचे महसूल विभागाचे अधिकारी, कर्मचारी शोषण करीत असल्याचा आरोप करण्यात आला. यावेळी संघटनेचे तालुकाध्यक्ष महेश ठाकूर, विभाग अध्यक्ष काले सिंह, टिटू त्यागी, महेश पैलवान, हरिओम, बलराज सिंह, संजीव बालियान, लिख्खू सिंह, मास्टर महेंद्र सिंह, तेजपाल सिंह, रामपाल सिंह, चौधरी भगवान सिंह, सीता आर्या आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here