कोल्हापूर विभागात ७ साखर कारखान्यांचे गाळप बंद

पुणे : राज्यातील साखर कारखान्यांनी आपले गाळप बंद केले आहे. अमरावती आणि नागपूर विभाग वगळता इतर सर्व विभागांतील कारखान्यांचे गाळप संपुष्टात येण्यास सुरुवात झाली आहे.

साखर आयुक्तालयाकडील अहवालानुसार, ११ मार्च २०२१ पर्यंत सोलापूर विभागातील २९ साखर कारखाने बंद झाले आहेत. तर कोल्हापूर विभागातील ७ साखर कारखाने बंद करण्यात आले आहेत. महाराष्ट्रात एकूण ४१ साखर कारखान्यांचे गाळप संपुष्टात आले आहे.

या हंगामात कोल्हापूर विभागात एकूण ३७ साखर कारखाने गाळप करीत होते. सोलापूर विभागात ११ मार्च २०२१ अखेर सर्वाधिक ४१ कारखान्यांनी गाळप केले.

साखर आयुक्तालयाकडील आकडेवारीनुसार, ११ मार्च २०२१ पर्यंत १८७ कारखान्यांनी गाळप हंगामात सहभाग घेतला. राज्यात एकूण ८८६.५२ लाख टन उसाचे गाळप झाले आहे. एकूण ९१८.५५ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन करण्यात आले आहे. राज्याचा सरासरी साखर उतारा १०.३६ टक्के इतका आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here