हरियाणा च्या साखर कारखान्यांनी साखर रिकवरी मध्ये केली वाढ

चंदीगड: हरियाणाच्या सहकारी आणि खासगी साखर कारखान्यांनी 2019-20 हंगामा दरम्यान साखरेच्या रिकवरी मध्ये वाढ केली आहे.

राज्याचे सहकारमंत्री डॉ. बनवारी लाल यांनी सांगितले की, राज्यात 15 एप्रिल पर्यंत एकूण 611.44 लाख क्विंटल ऊस गाळप केले आहे, तसेच या दरम्यान साखर रिकवरी सरासरी 10.45 टक्के राहिली. हीच रिकवरी हंगाम 2018-19 दरम्यान 624.98 लाख क्विंटल ऊस गाळपावर 10.19 टक्के राहिली होती.

त्यांनी सांगितले की, सहकारी साखर कारखान्यांनी हंगाम 2019-20 मध्ये 9.95 टक्के साखरेच्या सरासरी रिकवरीसह 353.48 लाख क्विंटल ऊसाचे गाळप केले, तर खासगी साखर कारखान्यांनी 257.96 लाख क्विंटल ऊसाच्या गाळपावर 11.13 टक्के साखरेची सरासरी रिकवरी मिळवली आहे.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here