ऊस दर जाहीर करून थकबाकी देण्याची रालोदची मागणी

शामली : हाथी करोडा गावात राष्ट्रीय लोकदलाचे राष्ट्रीय अध्यक्ष चौधरी जयंत सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी संदेश अभियान जोरदारपणे राबविण्यात आले. या बैठकीत गावातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. साखर कारखान्यांनी १४ दिवसांत ऊस थकबाकी जमा करावी, भटक्या गुरांच्या समस्येतून सुटका करावी, वीज बिले द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे केली आहे.

याबाबत लाइव्ह हिंदूस्थानमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, शेतकऱ्यांनी यापूर्वी वेळोवेळी आपले प्रश्न मांडले आहेत. त्यासाठी अनेकवेळा निवेदने देण्यात आली. तसेच, उसाचे राज्य समर्थन मूल्य निश्चित जाहीर करून साखर कारखान्यांनी उसाची थकबाकी तातडीने देण्याची मागणी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी प्रमुख धरमवीर सिंग होते. प्रभात मलिक यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमात जिल्हा पंचायत सदस्य उमेश पवार, कार्यक्रम प्रभारी हरेंद्र वर्मा, सुनील मलिक, ओमपाल सिंग, बाजू रामदास, चिनू गोसाई, चंद्र कश्यप, अश्वनी मलिक, भुरा सतपाल सिंग, देवेंद्र, उमेश कुमार आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here