रुद्र बिलास सहकारी साखर कारखान्यामध्ये गाळप हंगाम सुरु

रामपुरा, उत्तर प्रदेश: रुद्र बिलास सहकारी साखर कारखाना या जिल्ह्यातील एकमेेव कारखान्यात गुरुवारी गाळप सुरु झाले आहे. राज्यमंत्री बलदेव औलख यांनी फीत कापून गाळप हंगामाचा शुभारंभ केला. दरम्यान जिल्हाधिकारी अन्जनेय कुमार सिंह आणि साखर कारखान्याचे प्रधान व्यवस्थापक राजेश गुप्ता आदी उपस्थित होते.

प्रधान व्यवस्थापकांनी सांगितले की, रुद्र बिलास सहकारी साखर कारखान्याला यंदा 20 लाख क्विंटल उस गाळपाचे लक्ष्य मिळाले आहे. कारखान्याची मशिनरी जुनी झाल्याने याची गाळप क्षमता कमी आहे. कारखान्याने जुने देय जवळपास भागवले आहे. चार ते पाच करोड रुपये देय आहे, जे लवकरात लवकर भागवले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here