हंगाम २०२२-२३ : महाराष्ट्रात साखर कारखान्यांकडून ऊस बिले देण्यास गती

पुणे : महाराष्ट्रात गळीत हंगाम गतीने सुरू आहे. आणि याचबरोबर साखर कारखान्यांकडून वेळेवर ऊस बिले देण्यात येत आहेत.

चालू साखर हंगामात ऊसाचे गाळप करीत असलेल्या जवळपास १८९ साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना उसाचा योग्य आणि लाभदायी दरापैकी (FRP) ८२ टक्के बिले दिली आहेत.

साखर आयुक्तालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, या कारखान्यांनी १५ डिसेंबरअखेर २३६.६९ लाख टन उसाचे गाळप केले आहे. आणि या कारखान्यांना ७४०७.२० कोटी रुपयांची एफआरपी शेतकऱ्यांना देय होती. यापैकी शेतकऱ्यांना ६,०७५.२३ कोटी रुपयांची बिले दिली आहेत. राज्यातील ६९ कारखान्यांनी शेतकऱ्यांना १०० टक्के एफआरपी दिली आहे. तर २१ कारखान्यांनी ८० ते ९९ टक्के यांदरम्यान ऊस उत्पादक शेतकऱ्यांना पैसे दिले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here