साखर कारखान्यांना 25 ऑगस्टपर्यंत थकबाकी चुकवण्याचे आदेश

मांड्या : मद्दुर तालुक्यातील चामुंडेश्‍वरी साखर कारखान्याकडे ऊस शेतकर्‍यांची थकबाकी देय आहे. यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. याबाबत आता सरकारही गंभीर असून 25 ऑगस्टपर्यंत कारखान्याने ऊस शेतकर्‍यांची थकबाकी चुकवली नाही, तर कारवाईला सामोरे जावे लागेल असा इशारा उपायुक्त एम.वी.वेंकटेश यांनी दिला आहे.

अहवालानुसार, ज्या ऊस शेतकर्‍यांनी गाळप हंगामासाठी कारखान्याला ऊस पुरवला होता त्यांचे 13.07 करोड कारखान्याकडे देय आहेत. कायद्यानुसार, गाळपानंतर 14 दिवसाच्या आत शेतकर्‍यांना त्यांची रक्कम देणे कारखान्याचे उत्तरदायित्व आहे, जर या नियमाचे उल्लंघन झाले, तर कारखान्याला 15 टक्के व्याजासाहित रक्कम शेतकर्‍यांना दिले पाहिजे.

कर्नाटकात ऊस शेतकर्‍यांचे सरकारविरोधातील आंदोलनाने अधिक वेग घेतला आहे. यापूर्वी, शेतकर्‍यांचे शिष्टमंडळाने कर्नाटकचे पूर्व मुख्यमंत्री कुमारस्वामी यांची भेट घेवून त्यांना अडचणी सांगितल्या होत्या. त्यावेळी त्यांनी कारखाने लवकरच शेतकर्‍यांची बाकी चुकवतील असे अश्‍वासन दिले होते.

हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here