उत्तम साखर कारखान्यावर शेतकर्‍यांचे धरणे आंदोलन अजूनही सुरु

नजीबाबाद : ऊस थकबाकी भागवण्याच्या मागणीला घेवून भाकियू लोकशक्ती चे धरणे आंदोलन एका आठवड्यापासून सुरु आहे. उत्तम साखर कारखाना प्रशासनाने आंदोलन करणार्‍या शेतकर्‍यांना अवगत केले आहे कि त्यांची शेतकर्‍यांना वेळेत ऊस थकबाकी देणे ही प्राथमिकता आहे.

भाकियू लोकशक्ती चे जिल्हाध्यक्ष चौ. वीरसिंह यांच्या नेतृत्वामध्ये उत्तम साखर कारखाना बरकातपूर वर ऊस थकबाकी बाबत शेतकर्‍यांचे बेमुदत धरणे आंदोंलन मंगळवारीही सुरुच राहिले. जिल्हाध्यक्ष म्हणाले, जोपर्यंत शेतकर्‍यांची सर्व थकबाकी भागवली जात नाही तोपर्यंत धरणे आंदोलन सुरुच राहिल.

साखर कारखान्याचे मुख्य व्यवस्थापक नरपतसिंह यांनी पाच दिवसांपूर्वी पाच करोड रुपये उस थकबाकी डीएम च्या शेड्युलप्रमाणे जाहीर केली होती. ते म्हणाले, शेतकर्‍यांची अधिकाधिक ऊस थकबाकी भागवणे ही त्यांची प्रथमिकता आहे. मुख्य व्यवस्थापकानी शेतकऱ्यांना सर्व पैसे भागवण्याचे आश्‍वासन दिले.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here