ऊस बिलांसाठी शेतकऱ्यांचे टोल नाक्यावर आंदोलन

रामपूर : ऊसाची बिले न मिळाल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी नैनीताल रस्त्यावरील कोळसा टोल नाक्यावर आंदोलन केले. अधिकाऱ्यांनी आश्वासन दिल्यानंतर तीन तासांनंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.

भारतीय किसान युनीयनचे जिल्हाध्यक्ष हसीब अहमद यांच्या निर्देशानंतर विभाग उपाध्यक्ष मुहम्मद तालिब यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी कोळसा टोल नाक्यावर एकत्र आले. संतप्त शेतकऱ्यांनी टोल नाका बंद पाडला. त्यानंतर शेतकऱ्यांनी तेथेच धरणे आंदोलन सुरू केले. काही वेळातच नैनीताल रस्त्यावर दोन्हीकडे वाहतूक कोंडी झाली. आंदोलनाची माहिती मिळाल्यावर अप्पर पोलिस अधिक्षक संसार सिंह, तहसीलदार रामजी मिश्र तेथे आले. त्यांनी शेतकऱ्यांच्या अडचणींची माहिती घेतली. जिल्ह्यातील कारखान्यांकडे कोट्यवधी रुपये थकीत असल्याचे तालिब यांनी सांगितले. गेल्या वर्षी धान्य खरेदीत मोठा घोटाळा करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. याबाबत जिल्हाध्यक्षांसह अनेक संघटनांनी मुख्यमंत्र्यांसमोर तक्रार केल्याचे ते म्हणाले.

आता गहू खरेदीतही मोठा घोटाळा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांना डावलून दलाल आणि व्यापाऱ्यांची खरेदी सुरू असल्याचे तसेच पाण्याची अडचण शेतकऱ्यांनी मांडली. यावेळी अधिकाऱ्यांनी कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर तीन तासांनी आंदोलन स्थगित करण्यात आले. यावेळी मुहम्मद तालिब, तौकीर अहमद, शाकिर अली, शकील अहमद, नदीम अहमद, फरजंद अली, मुहम्मद शाहिद, अनीस अहमद, शफीक अली, फरमान अली, अकील अहमद, अब्दुल मुस्तफा, वसीम, राम बहादूर सागर, हरिओम, रवि, सुभाष चंद्र शर्मा, होरी लाल, विनोद यादव, हरपाल सिंह, मदन पाल, रामबहादूर आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here